नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – आशिया कपमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये भारताकडून दणदणीत पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा कप्तान सर्फराज अहमदनं भारतीय संघ पाकपेक्षा उत्कृष्ट असल्याची कबुली दिली आहे. आशिया कपमध्ये रविवारच्या सामन्यात पाकिस्ताननं सात गडी गमावून २३७ धावा केल्या तर आधीच्या सामन्यात पाकने सर्वबाद १६२ धावा केल्या. पाकिस्तानच्या १७ फलंदाजांना भारतानं बाद केलं, तर भारताचे मात्र अवघे तीन फलंदाज बाद झाले. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिनही आघाड्यांवर भारतानं पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं असून सोमवारी पाकिस्तानचा कप्तान सर्फराज अहमद यानं भारतीय संघ पाकपेक्षा वरचढ असल्याचं मान्य केलं आहे.