भारताने या आधीच पाकिस्तानशी सगळे संबंध तोडायला हवे होते – संजय राऊत

0
392

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – भारत ७० वर्ष पाकिस्तानशी चर्चा करत आहे. तरी देखील जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता माजली म्हणून भारताने आता कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला याबद्दल काय वाटते हे महत्वाचे नाही तर भारतानेचं पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडायला हवे होते, असे म्हणत शिवसेना खा. संजय राऊत यांनी पाकिस्तानने भारताशी तोडलेल्या संबंधांवर प्रतिक्रिया दिली आहे.

मोदी सरकारच्या कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानने भारताच्या निर्णयाचा निषेध केला असून भारतासाठी हवाई मार्ग बंद केला आहे. तसेच भारताच्या राजदूतांना जाण्यास सांगितले आहे. तर आपले देखील अधिकारी माघारी बोलावले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तडकाफडकी निर्णय घेत. इतर देशांना देखील हवाई मार्ग बदलण्याची नोटीस दिली आहे. तर काही विमानांना उंचीवरून उड्डाण करण्यास सांगितले आहे.