भारताने पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केल्यास १० वेळा उत्तर देऊ; पाकिस्तानने ओकली गरळ   

0
806

 नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – भारताने सर्जिकल स्ट्राइकसारखी पुन्हा हिंमत केली. तर त्याच्या दहा पट ताकदीने त्यांना उत्तर दिले जाईल, अशी गरळ पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ओकली आहे. ते लंडन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. पाकिस्तानी लष्कराला देशात लोकशाही मजबूत करायचे आहे, असेही त्यांनी यावेळी  सांगितले.

चीन-पाकिस्तानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाबत (सीपेक) बोलताना आसिफ गफूर म्हणाले की, या योजनेमुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या योजनेला सुरक्षा पुरवणे ही सशस्त्र दलाची जबाबदारी आहे. आजचा पाकिस्तान हा कालच्या पाकिस्तानपेक्षा चांगला आहे.  भविष्यात आम्ही आणखी मजबूत होऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रीय एकतेपेक्षा उत्कृष्ट काहीच नाही, असे सांगत त्यांनी निवडणुका प्रभावित करण्याचा पाक लष्करावरील आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्ट केले. यासंबंधी कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते समोर आणले पाहिजे. पाकिस्तानच्या लोकांनी आपल्या इच्छेनुसार मतदान केले आहे.