Notifications

भारताने पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केल्यास १० वेळा उत्तर देऊ; पाकिस्तानने ओकली गरळ    

By PCB Author

October 14, 2018

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – भारताने सर्जिकल स्ट्राइकसारखी पुन्हा हिंमत केली. तर त्याच्या दहा पट ताकदीने त्यांना उत्तर दिले जाईल, अशी गरळ पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ओकली आहे. ते लंडन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. पाकिस्तानी लष्कराला देशात लोकशाही मजबूत करायचे आहे, असेही त्यांनी यावेळी  सांगितले.