भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच; सॅम पित्रोदांचे वादग्रस्त विधान

0
693

नवी दिल्ली,  दि. २२ (पीसीबी) –  भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार धरून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेसचे ओव्हरसीज अध्यक्ष आणि गांधी कुटुंबीयांचे विश्वासू  सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काही जण भारतात येऊन हल्ले करतात, त्यासाठी तुम्ही संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणार का? असा सवाल करत पित्रोदांनी पाकिस्तानची बाजू मांडली आहे. यामुळे पित्रोदांवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.

पित्रोदा म्हणाले की,  मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला. त्यावेळी आम्हीदेखील (काँग्रेस) विमाने पाठवू शकत होतो. परंतु हे चुकीचे आहे. तुम्ही अशाप्रकारे वागू शकत नाही, असे म्हणत पित्रोदांनी अप्रत्यक्षपणे एअर स्ट्राईकवर टीका केली आहे. एअर स्ट्राईक करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.