दुबई, दि. २९ (पीसीबी) – दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत भारताने बांगलादेशवर ३ गडी राखत विजय मिळवून आशिया कपवर सातव्यांदा नाव कोरले. ६ चेंडूत ६ धावा पासून ते अखेरच्या एका चेंडूत १ धाव असा श्वास रोखून धरणारा सामना भारत जिंकणार की बांगलादेश जिंकणार की सुपरओव्हर होणार ? अशा सर्व शक्यता अखेरपर्यंत राखत हा सामना भारताने जिंकला.