भारताचा बांगलादेशवर ३ गडी राखून विजय; सातव्यांदा  जिंकला आशिया चषक

0
399

दुबई, दि. २९ (पीसीबी) – दुबई  इंटरनॅशनल स्टेडियममध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत  अत्यंत चुरशीच्या झालेल्या  अंतिम लढतीत भारताने बांगलादेशवर ३ गडी राखत विजय मिळवून आशिया कपवर सातव्यांदा  नाव कोरले.  ६ चेंडूत ६ धावा पासून ते अखेरच्या एका चेंडूत १ धाव असा  श्वास रोखून धरणारा सामना  भारत जिंकणार की बांगलादेश जिंकणार की सुपरओव्हर होणार ? अशा सर्व शक्यता अखेरपर्यंत राखत हा सामना   भारताने जिंकला.