Desh

भाजप सरकारने अर्थव्यवस्था पंक्चर केली- प्रियांका गांधी

By PCB Author

August 31, 2019

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी)-   देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्था पंक्चर करून टाकली आहे,’ अशी टीका प्रियांकांनी केली आहे.

प्रियांका यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मंदीचे वातावरण आहे. ऑटोमोबाइल उद्योगासह अन्य क्षेत्रांत नोकरकपातीला सुरुवात झाली आहे. जीडीपी दर खाली आला आहे. याच मुद्द्यांवरून प्रियांकांनी सरकारला धारेवर धरले आहे. ‘देशाच्या अर्थव्यवस्थेचे किती हाल झाले आहेत हे जीडीपीच्या दरावरून स्पष्ट दिसते आहे. ना जीडीपी वाढला आहे ना रुपया मजबूत झाला आहे. रोजगार मिळेनासे झाले आहेत. अर्थव्यवस्थेचा सत्यानाश करण्याचा हा कारनामा कोणाचा हे आतातरी सांगून टाका,’ असे आव्हानच प्रियांकांनी सरकारला दिले आहे.