भाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार

0
887

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – आगामी काळात मोदी, भाजप-शिवसेना यांचा पराभव करायचा हे एकच ध्येय असले पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस या पराभवाचे माध्यम ठरला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे  नेते अजित पवार यांनी आज (मंगळवार) केले.

‘चला देऊया मदतीचा हात’ या राष्ट्रवादीच्या विशेष कार्यक्रमात पवार बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, भाजपचा दारुण पराभव करुन आपल्या विचाराचे सरकार आणण्याचे एकच ध्येय असले पाहिजे. त्यासाठी पक्षाला अधिक वेळ द्या. कमी पडू नका.  मागे राहू नका असे आवाहन करून   प्रत्येक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी झोकून दिले पाहिजे. तसे काम करुन राज्यात ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून आणा, असे आवाहनही अजित  पवार यांनी केले.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मूलमंत्रही दिला. काहीवेळा पक्षाला काही जागा सोडाव्या लागतील. त्यावेळी नाराज न होता येत्या काळात सत्ता आणावयाची आहे हे लक्षात ठेवा. जो त्याग करेल त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल असेही त्यांनी सांगितले.