भाजप-शिवसेना विघ्नांचे सरकार देवाने दूर करावे – अशोक चव्हाण

0
439

यवतमाळ, दि. ४ (पीसीबी) – राज्यातील भाजप-शिवसेना सरकार विघ्नांचे सरकार आहे, देवाने हे विघ्न दूर करावे.  या सरकारच्या त्रासातून सामान्य जनतेला दिलासा मिळाला पाहिजे, असे साकडे आम्ही देवाला घातले, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (मंगळवार) येथे सांगितले. 

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून आज  सुरुवात झाली . यावेळी कळंबच्या श्री चिंतामणी गणपतीची आरती करुन जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी चव्हाण बोलत होते.

यावेळी अशोक चव्हाण यांनी  ओवीसी आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले. राज्यात चांदा ते बांदा भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवणार आहे. मात्र, विद्यमान युती सरकारची दुष्काळाचा सामना करण्यासाठी तयारी नाही. हे विघ्नांचे सरकार आहे, देवाने हे विघ्न दूर करावे. सामान्य जनतेला दिलासा मिळाला पाहिजे, असे साकडे आम्ही देवाला घातल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान,  गणपतीच काय आता जनता ही आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला आता काळजी नाही. आता जनताच आमची निवडणूक लढवेल आणि आम्हाला जिंकवेल, असा विश्वास  त्यांनी यावेळी व्यक्त केला.