भाजप महाराष्ट्रात स्वतंत्र लढल्यास २५ खासदार, तर शिवसेनेसोबत लढल्यास ४५ खासदार निवडून येतील

0
744

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांचा अंतर्गत आढावा घेण्याचे काम सुरु केले आहे. सप्टेंबरमध्ये पूर्ण झालेल्या या आढाव्यात राज्यात भाजप स्वबळावर लढला तर गेल्या वेळेपेक्षा जास्त म्हणजे २५ जागा जिंकू शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शिवसेनेसोबत युती झाली तर ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वेळी भाजप-शिवसेना आणि स्वाभिमानी युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या.