Notifications

भाजप नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये; गावाच्या वेशीवर फलक

By PCB Author

October 06, 2018

अमरोहा, दि. ६ (पीसीबी) – दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करणाऱ्या भाजप सरकारचा उत्तर प्रदेशातील अमरोहातील धनौरा तालुक्यात अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. धनौरा तालुक्यातील रसूलपूर माफीच्या ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच फलक लावून, भाजप नेत्यांना गावात येण्यास बंदी असल्याचे जाहीर केले आहे.