मुंबई, दि. ५ (पीसीबी) – विरोधकांनी माझे वक्तव्य अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण केला आहे. आदल्या दिवशी पत्रकार दहीहंडीच्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी काहीही आक्षेप घेतला नाही, कारण त्यांनी पूर्ण संभाषण ऐकले होते, असे सांगत भाजप आमदार राम कदम यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत खेद व्यक्त केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.