मुंबई, दि. १७ (पीसीबी) – घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात महिलाविषयी वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांनी आपल्या विधानासाठी राज्य महिला आयोगाकडे बिनशर्त माफी मागितली आहे. याबाबत राम कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला खुलासा पाठवला आहे. भविष्यात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा त्यांनी शब्द दिला आहे.