Desh

‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू

By PCB Author

December 11, 2018

हैदराबाद, दि. ११ (पीसीबी)- भाजपाने मागील पाच वर्षात काहीही कामे केली नाहीत. लोक त्यामुळे नाराज झाले आहेत. त्याचमुळे लोक आता आमच्यासोबत आहे. लोकांनी आम्हाला साथ देण्याचे नक्की केले आहे. आता आम्ही भाजपा विरोधात लोकसभेची निवडणूकही लढणार आहे असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. पाच राज्यातल्या या निवडणुकांचे निकाल म्हणजे महाआघाडीसाठी दिलासादायक चित्र आहे या जोरावर आम्ही भाजपाला टक्कर देऊ शकतो असेही चंद्राबाबू नायडूंनी म्हटले आहे.

एवढेच नाही तर तेलंगणाच्या जनतेने जो कौल दिला आहे त्याचा आम्हाला आदर आहे असेही चंद्रबाबू नयाडू यांनी म्हटले आहे तसेच निवडून आलेल्या सगळ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले आहे.