भाजपात बुजुर्ग नेत्यांना महत्व नाही; पण त्यांच्या अस्थींना महत्व – उद्धव ठाकरे

0
655

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश यात्रेवरून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यास्पद राजकारण सुरू असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. वाजपेयी हे अजातशत्रू होते. ते भाजपा, संघ परिवाराचे होते. संपूर्ण देश त्यांचा होता वते देशाचे होते. पण सध्या त्यांच्या अस्थिकलशावरून होणार हास्यास्पद राजकारण कोणालाच शोभणारे नाही. भाजपात बुजुर्ग नेत्यांना महत्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्व मिळत असल्याचा टोलाही लगावला आहे. सध्या भाजपातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मिळत असलेल्या वागणुकीवरही या माध्यमातून सेनेने भाजपावर शरसंधान साधले.