बारामती, दि.११ (पीसीबी) – दिल्ली निवडणुकीत आपचा विजयी वारू भाजपाला रोखता आलेला नाही. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. मात्र दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आले आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खा. शरद पवारांनी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
Congratulations to Shri. Arvind Kejariwal ji and Aam Admi Party workers for achieving a 'Sweeping Victory' in the Delhi Assembly Polls!@ArvindKejriwal @AamAadmiParty #DelhiElectionResults #DelhiPolls2020 #DelhiResults #DelhiElection2020
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 11, 2020
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर ज्यांनी पक्षाची रणनीती ठरवली होती त्यांनी दिल्लीच्या मतदारांचे आभार मानले आहेत. दिल्लीच्या निकालावर ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, “धन्यवाद दिल्ली….भारताच्या आत्म्याचं रक्षण करण्यासाठी उभे राहिल्याबद्दल”.
Thank you Delhi for standing up to protect the soul of India!
— Prashant Kishor (@PrashantKishor) February 11, 2020
दरम्यान, दिल्ली निवडणुकीच्या निकालाबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केलीय. याबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजपचा अहंकार जनतेने नाकारत विकास आणि विश्वासाला मत देत आप पक्षाच्या बाजूने निकाल दिल्याचं मत नवाब मलिकांनी व्यक्त केलं.
दिल्ली चुनाव प्रचार मे नरेंद्र मोदीजी ने २ सभा और अमित शाह ने ४०प्रचार सभा को संबोधित किया था।देशभर से एक लाख से ज्यादा बीजेपी के नेता और महाराष्ट्र से भी बडे नेताओं ने दिल्ली जाकर बीजेपी का प्रचार किया था । उस सबका क्या परिणाम आया है यह आज पुरे देश ने देख लिया है #DelhiElection pic.twitter.com/OXlsn2IXLv
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 11, 2020