भाजपला सत्तेपासून दूर करण्यात लोक यशस्वी

0
334

बारामती, दि.११ (पीसीबी) – दिल्ली निवडणुकीत आपचा विजयी वारू भाजपाला रोखता आलेला नाही. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आपने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. मात्र दुसरीकडे आपकडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आले आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे  खा. शरद पवारांनी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर ज्यांनी पक्षाची रणनीती ठरवली होती त्यांनी दिल्लीच्या मतदारांचे आभार मानले आहेत. दिल्लीच्या निकालावर ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, “धन्यवाद दिल्ली….भारताच्या आत्म्याचं रक्षण करण्यासाठी उभे राहिल्याबद्दल”.

दरम्यान, दिल्ली निवडणुकीच्या निकालाबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केलीय. याबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजपचा अहंकार जनतेने नाकारत विकास आणि विश्वासाला मत देत आप पक्षाच्या बाजूने निकाल दिल्याचं मत नवाब मलिकांनी व्यक्त केलं.