भाजपमधील नाराजांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी आशीष देशमुखांच्या हालचाली

0
451

नागपूर, दि. ५ (पीसीबी) –  भाजपमध्ये नाराज असलेले काटोलचे आमदार  आशीष देशमुख यांनी नुकताच पक्षाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी     वर्ध्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. देशाच्या विकासासाठी गांधी विचारधारेशिवाय पर्याय नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्या भाजप व भाजप समर्थक आमदार व खासदारांनी परत आपल्या  घरात यावे, यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.   

२०१४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची विचारधारा मानणारे अनेकजणांनी भाजपची उमेदवारी घेऊन विजय मिळवला. त्यात आशीष देशमुखांचाही समावेश आहे. आशीष देशमुखांप्रमाणे काही आमदार-खासदार नाराज आहेत. खासगीत काही आमदार व खासदार भाजपच्या वरिष्ठावर नाराज असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

या पार्शवभूमीवर देशमुख यांनी नाराजांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. देशमुख यांनी “परत फिरा’, मोहिम राबविणार आहेत. महात्मा गांधी यांच्या विचारधारेवरच आपला समाज व देश मजबूत होईल. या विचारधारेला मानणाऱ्या पक्षात राहून आपल्या समाजाचा सर्वांगिण विकास होणार आहे. भाजप व भाजप समर्पित पक्षात असलेल्या खासदार-आमदारांनी आपल्या अंतर्मन व विवेकाशी प्रतारणा न करता काँग्रेसमध्ये परत यावे, अशी विनंती देशमुख करणार आहेत.