जळगाव, दि. ११ (पीसीबी) – राज्यात भाजपचे आमदार आणि पदाधिकारी बेताल विधाने करत सुटले आहेत. तर आमदार मुलीना पळवून नेण्याच्या विधाने करत आहेत. परंतु गृह खाते त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता भाजपला आलेली सत्तेची मस्ती जनताच उतरवेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुळे बोलत होत्या.