भाजपची चिंता वाढली; आणखी एक पक्ष एनडीएतून बाहेर पडणार? 

0
411

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – भाजपवर नाराज असलेले केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह  शुक्रवारी (दि.७) होणाऱ्या मोतिहारीमधील पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात   एनडीएतून बाहेर पडायचे की नाही, याबाबत निर्णय घेणार आहेत.  यामुळे ते कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.  त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास भाजपसाठी धक्का असू शकतो.