मुंबई, दि. ३० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. सत्ताधारी भाजपनेही निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले आहे. राज्यात शिवसेनेसोबत युती करून निवडणुका लढवण्यासाठी भाजप नेते आग्रही आहेत. मात्र, शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे भाजपनेही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. भाजपने राज्यातील लोकसभेच्या ३० जागा जिंकून आणण्याची व्युहरचना केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.