चेन्नई, दि. १२ (पीसीबी) – मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसकडून झालेल्या पराभवानंतर भाजपचा प्रभाव कमी होत असल्याचे सिद्ध होत आहे, अशी प्रतिक्रिया दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी दिली आहे. जनतेने दिलेला कौल भाजपासाठी मोठा धक्का आहे, असे ही त्यांनी म्हटले आहे. रजनीकांत यांनी आज (बुधवार) चेन्नई विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, रजनीकांत यांनी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू मांडली होती. यानंतर त्यांना प्रादेशिक पक्षांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. भाजप एक धोकादायक पक्ष आहे का असे विचारले असता, जर विरोधकांना तसे वाटत असेल, तर असावे, असे उत्तर त्यांनी दिले होते.