भांडणे सोडवली म्हणून दुकानदाराला पाठलाग करून मारहाण

0
290

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – दुकानासमोर सुरु असलेल्या भांडणे एका दुकानदाराने मध्यस्थी करून सोडवली. याचा राग मनात धरून चार जणांनी मिळून भांडणे सोडवणा-या दुकानदाराला पाठलाग करून मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री साडेनऊ वाजता नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.
नावेद अली सय्यद (वय 30, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश रजपूत (वय 21), रोहित रजपूत (वय 22), सांड्या (पूर्ण नाव माहिती नाही, तिघे रा. विठ्ठलनगर, पिंपरी), मोन्टी वाल्मिकी (वय 22, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता फिर्यादी सय्यद यांच्या दुकानासमोर दोन दुचाकीवरील महिला आणि पुरुषांचे भांडण चालले होते. ते भांडण सय्यद यांनी मध्यस्थी करून सोडवले. या कारणावरून त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. सय्यद यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.