बेळगावप्रश्नी सुप्रीम कोर्टात हरिश साळवेंच्याच तोडीचा निष्णात वकिल देणार – अजित पवार

0
332

मुंबई,दि.१९(पीसीबी) – बेळगावप्रश्नी जेष्ठ वकिल हरिश साळवे यांना वेळ नसेल तर त्याच तोडीचा निष्णात वकिल राज्य सरकार देईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दोन राज्यांचा वाद असल्यास वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद होत असतात. जे ते आपापल्यापरीने विचार करत असतात. पण आता हा विषय सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे बेळगावप्रश्नी दर्जेदार वकिल देण्यास आणि हा प्रश्न निकाली काढण्यास राज्य सरकार कटीबद्ध आहे, असंही ते म्हणाले.

सीमाप्रश्नी पहिल्यांदा वकिल हरिश साळवे यांना देण्याचं ठरवलं होतं. पण ते सध्या दिल्लीत राहत नसल्यानं आणि कामातून त्यांना वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्याच तोडीचा निष्णात वकिलाला नेमलं जाईल, असंही ते म्हणाले.