Maharashtra

बॅलेट पेपरवर जरी निवडणूक घेतली तरी भाजपच जिंकणार; चंद्रकांत पाटलांचा छातीठोक दावा

By PCB Author

August 25, 2019

नागपूर, दि. २५ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची सगळी तयारी झाली आहे. लोकांचं ठरलंय ते पुन्हा भाजपलाच संधी देणार आहेत. त्यामुळे ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर जरी निवडणूक घेतली तरी भाजपच जिंकणार आहे, असा छातीठोक दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

उपराजधानी नागपूरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. आम्हाला जर गडगडच करायची असती तर आम्ही बारामतीत केली असती आणि ती ही जागा जिंकली असती, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.  बॅलेट पेपरवर जरी निवडणूक घेतली तरीदेखील भाजपला कसलाच फरक पडणार नाही. आम्ही २२० जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.