बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला

0
829

मुंबई,दि.३(पीसीबी) – बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना हीच ती वेळ अशी आठवण करुन दिली आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेल्या राजू पाटील यांनी ट्विटवरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव यांच्या नावातील अद्याक्षरे वापरुन राजू यांनी आता बुलेट ट्रेनबद्दल निर्णय घेताना यू टर्न घेऊ नका असा सल्ला दिला आहे.

“आता ‘यू’ ‘ट’र्न नको! बुलेट ट्रेन साठी महाराष्ट्र सरकारला द्यावे लागणारा हिस्सा व त्यासाठी बीकेसी व इतर ठिकाणी भू संपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरावे.बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळायची हीच वेळ आहे,” असं ट्विट राजू यांनी केलं आहे.