Maharashtra

बुडत्याचा पाय खोलात; ‘हा’ मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार ?   

By PCB Author

August 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस – राष्ट्रवादी  पक्षातील अनेक नेते भाजप –शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यातच आता काँग्रेस आघाडीचा मित्र पक्ष असलेला राजेंद्र गवई यांच्या रिपाई पक्षाने आघाडीला  सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे.  यामुळे आघाडीला आणखी जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.

रिपाई पक्षाने  अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि दर्यापूरच्या जागेसह  आघाडीकडे १० जागांची मागणी केली आहे.  या जागा मिळाल्या नाही, तर सर्व जागा लढवू आणि अमरावती जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडू,  मग आम्हाला भाजपची ‘बी’ टीम म्हणू नका, असे राजेंद्र गवई यांनी  म्हटले आहे.

राजेंद्र गवई प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याची इच्छा राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली आहे. याबाबत लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वंचित आघाडीने आघाडीसोबत निवडणूक लढवाव्यात, त्यांचे उमेदवार निवडून येतील, असेही ते म्हणाले.