मुंबई, दि. १८ (पीसीबी) – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघांत गुरुवारी (दि. १८) सकाळी मतदानाला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात १७९ उमेदवार मैदानात असून १ कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार १० खासदारांना संसदेत पाठवतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपच्या प्रीतम मुंडे, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.