बिहारमध्ये वीज कोसळून आठ बालकांचा मृत्यू; नऊ गंभीर

0
452

बिहार, दि. १९ (पीसीबी) – पूराच्या संकटात सापडलेल्या बिहारमध्ये आता आणखी एक भयानक घटना घडली आहे. येथील नवादा जिल्ह्यातील धनापूर गावात वीज कोसळून आठ बालकांचा मृत्यू झाला आहे तर अन्य नऊ जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.

सर्व जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.