बिहारमध्ये कार तलावात कोसळून सहा चिमुरड्यांचा दुर्देवी मृत्यू

0
571

पाटणा, दि. १९ (पीसीबी) –  वऱ्हाडाची कार तलावात कोसळून बिहारमध्ये सहा चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झाडावर आदळून गाडी तलावात पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्साकाटामधील चिकनी गावात लग्न समारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांची कार डोरिया गावी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर आंबे तोडणाऱ्या लहान मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळून गाडी तलावात बुडाली. या अपघातात गाडीत असलेल्या दहापैकी सहा बालकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात ते चौदा वर्ष वयोगटातील चिमुरड्यांचा समावेश आहे. चौघा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.