बाळासाहेब आज हयात असते, तर त्यांनी उध्दवांना रोखले असते

0
637

 अयोध्या, दि. २५ (पीसीबी) – राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेची कोणतीही भूमिका नाही. उध्दव ठाकरे यांनी अयोध्येला येऊन रामलल्लांचे दर्शन घेण्यामध्ये काहीच गैर नाही. मात्र, जर आज बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी उद्धव यांना ते जे काही करत आहे,  त्यापासून रोखले असते, अशी टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अयोध्या दौऱ्यावर  केली आहे.

विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आयोजित केली असताना शिवसेनेला वेगळा कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती, त्यांनी विश्व हिंदू परिषदेसोबतच सहभाग घ्यायला हवा होता, बाळासाहेबांनी नक्कीच ‘विहिंप’ला पाठिंबा दिला असता, असेही मौर्य म्हणाले.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांचा २ दिवसांचा अयोध्या दौरा संपवून मुंबईकडे रवाना झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून देशभरात उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र,  केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.