बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भूखंड मिळत नाही, हे दुर्दैव; राज ठाकरेंचा राज्य सरकार आणि शिवसेनेवर निशाणा

0
395

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नावाचा वापर स्वार्थासाठी केला जात आहे. मात्र. त्यांच्या स्मारकासाठी सरकारला भूखंड मिळत नाही, हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर तोफ डागली.  महापौरांचा बंगला स्वार्थासाठी काढून घेतला जात आहे. मुंबईचा महापौर इकडेतिकडे फिरताना दिसत आहे. ही महापौर आणि या पदाची थट्टा आहे, असेही ते म्हणाले.