Chinchwad

बारावीत नापास झाल्याने सांगवीत विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

By PCB Author

May 29, 2019

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – बारावी बोर्डाच्या परिक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.

ऋषीकेश विलास पांचाळ (वय १७, रा. समर्थनगर, नवी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेशने यंदा बारावीची परिक्षा दिली होती. मंगळवारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहिर झाला. यामध्ये तो नापास झाल्याचे त्याला कळले. यामुळे निराश झालेल्या ऋषीकेशने मंगळवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ऋषीकेशला औंध रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सांगवी पोलीस तपास करत आहेत.