Desh

बारावीच्या परिक्षेदरम्यान विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By PCB Author

March 03, 2019

तेलंगणा, दि. ३ (पीसीबी) – बारावीच्या बोर्ड परिक्षेचा पेपर देताना एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२) तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे घडली.

गोपी राजू (वय १९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपी हा चैतन्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारी बारावीच्या परिक्षेला जाताना त्याच्या छातीत दुखत होते, मात्र परिक्षेसाठी उपस्थिती लावणे महत्वाचे असल्याने त्याने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. थोड्यावेळाने तो परीक्षा केंद्रावर पोहोचला, पण स्वतःच्या बेंचजवळ पोहोचताच तो खाली पडला. तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.