Maharashtra

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का…? – उर्मिला मातोंडकर

By PCB Author

December 30, 2020

मुंबई,दि. ३०(पीसीबी) – मुंबईत राहण्यासाठी केवळ बाप्पाच्याच परवानगीची गरज लागते. इतर कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेनेला डिवचणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टोला लगावला आहे.

माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभं राहण्यासाठी असं म्हणत उर्मिला यांनी बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ, असा मिश्किल सवाल ट्विटर वरून करत उर्मिला यांनी कंगनाचं नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे.

“for standing up for my beloved city Mumbai “ 🤔🤔🤔
बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…😂😂😂

— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020

दरम्यान कंगना रणौतने मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असं म्हणत तिने शिवसेनेला टोला लगावला.