बांद्र्याच्या ‘मातोश्री’वरुन नाही तर दिल्लीच्या ‘मातोश्री’वरुन निर्णय होतात – सुधीर मुनगंटीवार

0
349

मुंबई,दि.२२(पीसीबी) – कारण नसताना काँग्रेस, राष्ट्रवादीचं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता आहे. ते बॅलन्स करण्यासाठी तुम्ही सोनिया गांधींना भेटून घ्या. आता बांद्र्याच्या ‘मातोश्री’वरुन नाही तर दिल्लीच्या ‘मातोश्री’वरुन निर्णय होतात हे विसरु नका, असा टोला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर टोला लगवला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदींकडे मदत मागतील. दिल्लीच्या मातोश्रीवर जाऊन महविकास आघाडीचं सरकार टिकावं म्हणून महाशिवरात्रीला मोदींची भेट घेतील, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.