Maharashtra

बळी राज्याचं राज्य आलं; कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केल्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया!

By PCB Author

February 25, 2020

बीड,दि.२५(पीसीबी) – शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाली. एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर होऊन सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. जिल्हा पातळीवर अंमलबजावणीचं काम सुरू झालं आहे. बळीचं राज्य आलं, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडेंनी योजनेचे स्वागत केलं.

महाविकासआघाडी सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. यावर धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यामुळे कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आमच्या भागातील शेतकऱ्याला या कर्जमाफीमुळे नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.