बलात्कारप्रकरणी पंतप्रधान मोदींचे मौन अमान्य – राहुल गांधी

0
650

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – देशातील विविध भागातील बलात्काराच्या घटनामुळे  समाजात भीती निर्माण झाली आहे, देशात पुन्हा एकदा मुलींवर सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. बलात्कार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन अमान्य आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) ट्विट करून म्हटले आहे.  

राहुल गांधी आजपासून आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. कुरनूल येथे त्यांनी विद्यार्थी आणि पक्ष कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला.  यावेळी ते बोलताना म्हणाले की, देशातील महिलांना असुरक्षित आणि दहशतीखाली ठेवणाऱ्या सरकारची लाज वाटत आहे. येथे बलात्कारी खुलेपणाने फिरत आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, रेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणी काँग्रेसने हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर टीका केली आहे. याप्रकरणी अनेक ठिकाणी आंदोलनही केले आहे. यापूर्वीही विजय मल्ल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्र सरकारवर हल्ला  चढवला आहे.