Maharashtra

बघतोच, किती दिवस मुस्कटदाबी करणार हे सरकार – राजू शेट्टी

By PCB Author

August 23, 2019

कोल्हापूर, दि. २३ (पीसीबी) – सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलने करतो. त्यासाठी जर सरकार आम्हाला नोटीसाधाडत असेल तर मात्र हे अति होतंय असे स्वाभीमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

तसेच, गरीब, वंचित, शेतकृ–्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढतो हा सरकारला गुन्हा वाटत असेल तर, त्यांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, नोटीसा काढाव्यात, नजरकैदेत ठेवावे, रात्री अपरात्री ताब्यात घ्यावे आम्हाला कांहीही फरक पडत नाही. एवढे कमी पडते असे वाटत असेल तर ईडी, मोका, टाडा अशांनाही आमच्या मागे लावावे, आम्ही पण बघतोच, किती दिवस मुस्कटदाबी करणार ते अशा संतप्त शब्दात शेट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.