Maharashtra

फडणवीसांनी बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी – आदित्य ठाकरे

By PCB Author

February 26, 2020

मुंबई,दि.२६(पीसीबी) – देवेंद्र फडणवीसजी मी सहसा प्रत्युत्तर देत नाही. सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी, असं कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही असं म्हणत त्यांनी टीका केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

Shri @Dev_Fadnavis ji, normally I choose not to comment back. Kindly apologise abt bangles comment: bangles are worn by the strongest of all- the women. Politics can go on, but we need to change this discourse. Rather disgraceful coming from a fmr CMhttps://t.co/oMxPFWgdMS

— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 26, 2020

राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.