फडणवीसांनी बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी – आदित्य ठाकरे

0
410

मुंबई,दि.२६(पीसीबी) – देवेंद्र फडणवीसजी मी सहसा प्रत्युत्तर देत नाही. सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी, असं कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही असं म्हणत त्यांनी टीका केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.