फक्त दोन महिने थांबा, काँग्रेस, राष्ट्रवादीला गळती लागेल; रावसाहेब दानवेंची भविष्यवाणी

0
612

मुंबई, दि. १० (पीसीबी) – लोकसभेच्या निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा अवधी आहे. फक्त दोन महिने थांबा. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना गळती लागणार आहे, अशी भविष्यवाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वर्तवली आहे. समविचारी पक्षांची आमच्यासोबत लढण्याची तयारी नसेल, तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.