फकीराला संसारी माणसाचे दुखणे काय कळणार – अजित पवार

0
503

पुणे, दि. १२ (पीसीबी) – फकिराला संसारी माणसांच्या वेदनांची जाणीव काय होणार, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. ते मांडवगण फराटा येथे बोलत होते.

गांधी जयंती दिवशी सरकारने शेतकऱ्यांवर अश्रुधूर, पाण्याचे फवारे मारले. इतके असंवेदनशील हे सरकार असून संसारी माणसानेच सरकार चालवावे, फकिराला संसारी माणसांच्या वेदनांची जाणीव काय होणार, असे घणाघात अजित पवार यांनी नरेंद्र मोदींना लगावला.

दरम्यान, विजेचे भारनियमन सणासुदीच्या काळात सुरू केले असून, सण अंधारात साजरे करायचे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.