मुंबई, दि. २९ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हे जमावाकडून होणाऱ्या हत्येचे जनक असल्याचे फलक दिल्लीत भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी लावले होते. भाजपच्या या कृतीला मुंबई काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देणारे फलक लावले आहेत. प्रिय भाजपा, काँग्रेस आणि तुमच्यातील अंतर पाहा. हा संस्कारांचा फरक आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
Home Notifications प्रिय भाजपा, काँग्रेस आणि तुमच्यातील अंतर पाहा; राजीव गांधींवरील फलकाला मुंबई काँग्रेसचे...