प्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर

0
655

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या विस्कळित पाणीपुरठ्याच्या मुद्द्यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (दि. २०) तब्बल सहा तास घमासान चर्चा झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढत पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानुसार महापौरांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला ३१ ऑक्टोबरची डेडलाइन देऊन सभा तहकूब केली. दरम्यान सभेपूर्वी पाण्याच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. आंदोलनात घोषणा देताना नगरसेवकांचे भान सुटले. पिंपरी-चिंचवडच्या पाणी प्रश्नावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोर असल्याच्या घोषणा दिल्या. त्यावरून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी सभागृहात बोलताना इतक्या खालच्या पातळीचे राजकारण आम्ही कधीच केले नसल्याचे सांगत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला.