प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार – सरन्यायाधीश दीपक मिश्रा    

0
454

पुणे, दि. ९ (पीसीबी) – कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती आत्महत्या करु शकत नाही.  मात्र, प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीला दुर्धर आजाराने ग्रासले असेल आणि त्याला इच्छा मरण हवे असेल, तर तो ‘इच्छामरणाचे मृत्यूपत्र’ बनवू शकतो’, ‘अंतिम श्वास कधी घ्यायचा याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण  संबंधित व्यक्तीवर कोणत्याही दबाव नसावा’, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा  यांनी व्यक्त केले आहे.  

पुण्यामध्ये ‘बॅलन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राइट्स’ या विषयावर कार्यक्रम  आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान,९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाचे  सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने एक ऐतिहासिक निर्णय देताना मराणासन्न व्यक्तीच्या इच्छामरणाच्या मृत्यूपत्राबाबत मार्गदर्शकतत्त्व घालून देत कायदेशीर मान्यता दिली होती. आणि अखेरचा श्वास कधी घायचा याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला असेल, असे स्पष्ट केले होते.