औरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – ‘ईव्हीएमवरून होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर माझा अजिबात विश्वास नाही. मी दिलेल्या मताचे काय होईल, हे सांगताच येत नाही. अशा स्थितीत मी मतदान तरी का करायचे, म्हणून यंदा मी मतदान केलेच नाही,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेते नंदू माधव यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.