प्रकाश मेहतांसह सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू

0
374

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळाचा आज (रविवार) अखेर विस्तार झाला. त्याआधी प्रकाश मेहतांसह सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. यात प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांचा समावेश आहे.

या सहा मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत.  मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. एम. पी मिल कंपाऊंड  एसआरए घोटाळ्याच्या आरोपांमुळे प्रकाश मेहतांना मंत्रिमंडळातून डावलले आहे. तर इतर मंत्र्यांची कामगिरी सुमार असल्याने त्यांना नारळ देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रकाश मेहतांसह मंत्री मंडळातून डच्चू देण्यात आलेल्या या सर्व निष्क्रिय मंत्र्यांना आता पक्ष संघटनेत काम करावे लागणार आहे. तर मंत्रिमंडळाच्या विस्तारात  राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना  मंत्रिपद देण्यात आले आहे.