पोलादपूर अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत यांची तडकाफडकी बदली

0
349

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – पोलादपूर अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी प्रकाश सावंत यांची दापेली कृषी विद्यापीठातून रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. २८ जुलैला दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे मिळून ३४ जण बसने दापोली येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून प्रकाश सावंत हे आश्चर्यकारकरित्या बचावले होते.