पुलवामातील भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देऊ – पंकजा मुंडे  

431

पुणे, दि. १६ (पीसीबी) – पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्यात येईल, असा गर्भित इशारा राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.

पुण्यामध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला.

भारत हा सहिष्णु देश असून त्याचा वेगळा अर्थ काढण्यात येऊ नये, असेही त्यांनी ठणकावून   सांगितले. ‘सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अत्यंत भ्याड हल्ला केला आहे. गेल्या काही वर्षांत भारत जगातील विविध क्षेत्रांत  अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे शेजारी देशाने धास्ती घेतली आहे. मात्र, ज्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे, त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.