Desh

पुर्ण बहुमत असलेले सरकार येणार- नरेंद्र मोदी

By PCB Author

May 17, 2019

दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – भारत हा जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जगावर आपल्या देशाने छाप सोडली पाहिजे असे मला वाटते असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या कार्यकाळातील पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. आपल्या देशात विविधेतली एकता आहे आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र होतात. रमजान, ईस्टर, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, हनुमान जयंती सगळं एकत्ररित्या सुरू आहे.

सोशल मीडिया आल्याने पत्रकारांनाही कष्ट उपसावे लागले आहेत. निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा खूप चांगला अनुभव होता. पूर्ण बहुमत मिळून त्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे असेही मोदींनी म्हटले आहे. पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेले सरकार येईल असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.याआधी काहींना देशाचे नेतृत्त्व एक-दोन वर्षांसाठी सत्ता मिळाली किंवा एका परिवाराला सत्ता मिळाली.

मात्र लोकांनी बहुमताने निवडलेले सरकार पाच वर्षे चाललं ही बाब अनेक वर्षांनी घडली आहे असंही मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्या देशाचे आभार मानले. माझ्यासाठी निवडणूक प्रचार हा जनतेला धन्यवाद देण्यासाठी होता हेच मी मानतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.